“मी, शंकर पवार, शपथ घेतो की भारताच्या सौर्वभौमत्वाचे आणि भारताच्या हद्दीचे रक्षण करण्याची माझी जबाबदारी आहे आणि ते काम मी पुर्ण निष्ठा आणि विश्वासाने करीन. देशाच्या राष्ट्रपतींनी आणि माझ्या कमांडरने दिलेल्या आज्ञांचे पालन करीन आणि त्यासाठी जमीन, सागरी किंवा हवाई मार्गाने कुठेही जायची माझी तयारी आहे”
रणांगणावर घायाळ होऊन पडलेल्या हवालदार शंकर पवारच्या मनामध्ये सैन्यामध्ये सामील होताना घेतलेली शप्पथ जागी झाली होती. हुतात्मा वडीलांच्या पावलावर पाऊल ठेवुन तो सैन्यामध्ये भरती झाला होता आणि आज लढताना शत्रुच्या एका गोळीने त्याचा वेध घेतला होता. जखमी होऊन तो खाली कोसळला पण तपुर्वी त्याने ३ शत्रुच्या सैनीकांना यमसदनी धाडले होते.
असहाय्य, निर्जन स्थळी तो मदतीची वाट पहात पडला होता. जखमेतुन वहाणारे रक्त आणि क्षीण होत जाणारी शक्ती त्याची चिंता वाढवत होती. मृत्युचे भय त्याला नव्हते. सैन्यात भरती होतानाच त्याने मृत्युला आपलेसे केले होते. पण त्याला चिंता होती ती त्याच्या परीवाराची. त्याची वृध्द आई आणि पत्निची. आज जर का मला काही बरं वाईट झालं तर त्यांचं कसं होणार? याची. मिलीटरीचा शर्ट घालुन सैन्यात जायची स्वप्न पहाणाऱ्या त्याच्या लहानग्या मुलाची. एवढुश्या चेहऱ्यावर चेहऱ्यावर तळपते तेज घेऊन सैन्यातील सैनिक बांधवांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर बनण्याची मनिषा बाळगणाऱ्या त्याच्या मुलीची.
समोरच कोसळलेल्या शत्रु-सैनीकाच्या शरीराकडे त्याचे लक्ष गेले. कोण होता तो? नाव काय त्याचे? कुठला रहाणारा? त्याच्या घरी सुध्दा माझ्यासारखाच परिवार असेल का? का मारले मी त्याला? केवळ तो शत्रु होता म्हणुन? केवळ माझ्या कमांडरने सांगीतले म्हणुन? दोन दिवसांनी कदाचीत ‘तह’ होईल. आकाश्यात शांततेचे प्रतिक म्हणुन पांढरी कबुतर सोडली जातील. सदिच्छा म्हणुन जिंकलेले प्रदेश एकमेकांना परत केले जातील, हुतात्मांची स्मारकं उभी रहातील, चार दिवस त्यांच्यासमोर मेणबत्या जळतील. नंतर? नंतर त्यांच काय? अपंग सैनिक कुठल्याश्या बॅंकेत, खाजगी कचेऱ्यात वॉचमनच्या जागी भरती होतील. हुतात्मांच्या कुटुंबांना मदत जाहीर होतील, आश्वासनं दिली जातील जी त्यांच्यापर्यंत कधीच पोहोचणार नाहीत.
का करतो आपण युध्द? का मरतात एवढी निरपराध माणसं? सर्वजण सुख-शांतीनी नाही का जगु शकत? सैन्यावर, सुरक्षा यंत्रणेवर खर्च होणारा हा अमाप पैसा देश्याच्या, गरीबांच्या कल्याणासाठी नाही का वापरता येणार? कोण जबाबदार आहे ह्या प्रचंड विनाश्याला?
आज कुणाचीही पर्वा नं करता मी या युध्द-भुमीवर लढलो. जर उद्या मी या जगात नाही राहीलो तर सरकार माझ्या कुटुंबाची काळजी घेईल? माझ्या मुलाबाळांनी पाहीलेली स्वप्न पुरी होतील? माझ्या आईला, बायकोला सन्मानाची वागणुक मिळेल? का त्यांना आमचा ‘अमुक-अमुक’ हुतात्मा होता ह्याचे प्रमाण-पत्र घेऊन जागो-जागी ठोकऱाच खाव्या लागतील.
प्रश्न प्रश्न, प्रश्न. अनेक प्रश्न त्याच्या मनामध्ये तरळत होते ज्याची उत्तर त्याच्याकडे नव्हती. आजुबाजुला होणाऱ्या भयानक हिंसाचारामध्ये, दारु-गोळा, बंदुकांच्या आवाजांमध्ये तो घायाळ सैनीक मदतीची वाट पहात निपचीत पडुन होता.
it is really fact
its nice and direct touch to heart
It’s hard to read because it’s to heart touching
मी दिगंबर गवळी मला घायाळ सैनिकाचे आत्मवृत्त वाचून कसेतरी झाले.खरंच खूप चांगलं काम त्यांनी देशासाठी केलं.
धन्यवाद…..
खरंच मनात खोलवर या लेखाचे शब्द रूततात मी मंदोदरी मला या लेखातून बरेच काही शिकायला मिळाले आपण सर्वाँनी देशासाठी सत्कर्म केले पाहिजे
धन्यवाद..
khup chan writing aahe
Better
khup chaan aahe re ATMAVRUTTA.
मी जीवन गायकवाड मला तूमचा लेख खुप आवडला .
मी देवराम मी हा लेख वाचला छान वाटले.
khar ahe he.
aplya deshat celebrityna jevdha man milto na tyachya 10 % sudha aplya sainikana nahi milat tyana fakt varshatil 2 divas thodifar athavan keli jate ek 26 jan & 15 aug.
baki te simevar ahet yach goshticha visar padlela asto.
barobar bolalis rashmi…
agree with you
Karach aahe he aaple senik thite desha shathi balidan detat karan aapn jivant rahav pan aapn celebrity lokana jasta maan deto ka. Tar aase nahi hoila pahije. Khare celebrity te ahet je aaplya ujjwal bavishya sathi svatach balidan detat
shevati Lal Bahadur Shastri Suddha mahanun gele ki ‘Jai Javan Jai Kisan’
Tumi khr sagt ahe karn maje father pn ek army man ahe tumi jevda hero na man deta tycha hun jast man dela pahiji karn te aaplala bharta chi hero ahe
Tumi khr sagt ahe karn maje father pn ek army man ahe tumi jevda hero na man deta tycha hun jast man dela pahiji karn te aaplala bharta chi hero ahe
जळणा-या जळत रहा,जळतो सारेच आम्ही, जळण्याच्या लाख , त-हा राख मात्र जास्त कमी …. सगळयांचेच प्रश्न सारखे आहेत फक्त जाग बदलेली आहे..
Nicely penned.. Very true.
khupp sundar lihil aahes…
Very true n heart touching blog.
Army people are the real super heroes of our country’s!!!
Awesome
Hya lekhatil vichar mala khup aavdale mi 9th std madhye shikte ani malahi sainik vhayachi khup eccha aahe
Very touching story an imotinal
It’s real fact and everyone should think about it…..
Really interesting amazing . I should read it.
Too emotional and true story I loved it
MALA SHAHID JAWANACHYA PATNICHI AATMKATHA HA ESSAY HAWA AAHE
Good its very nice
It’s very true fact and everyone and everyone should think about it……..and everyone should respect our army ……….i love army…
very nice 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👏👏👏👏🌹🌹💐💐
Amazingly written
Accutuly this is a very nice essay i have just writing this essay i was really like this and I’m proud of the all indian army’s people I love army
Very nice and good easy writeing☺🙏🙏🙏🙏👍👏
Very boring😔😔😔👎👎👎